

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत ईव्हीएम विरोधातील आक्रोशाची चिंगारी पेटली आहे. ही चिंगारी संपूर्ण देशभर पेटण्याअगोदर निवडणूक आयोगाने राज्यात तातडीने पुनर्मतदानाचा आदेश काढावा. निवडणूक आयोगाने आदेश काढला नाही, तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि त्यातूनही काही नाही झालं तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मारकडवाडीमधून ‘लॉंग मार्च’ काढणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली.