राजू शेट्टींनीच विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार झाले पाहिजे - विशाल पाटील

Raju Shetti Vishal Patil
Raju Shetti Vishal Patil

सांगली ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टींनीच विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार झाले पाहिजे. त्यांनी कोणत्याही कारणाने नकार देऊ नये. सैल झालेली संघटना पुन्हा बांधण्यासाठी त्याची गरज आहे, असे मत कॉंग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी "सकाळ' शी बोलताना व्यक्त केले. 
श्री. पाटील यांनी सन 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती.

त्याआधीही शेट्टींशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिलेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त ते अधिक निकट आले. या पार्श्‍वभूमीवर शेट्टींच्या राजकीय वाटचालीतील कोंडीच्या काळात पाटील यांनी शेट्टींच्या बाजूने भूमिका मांडली. 
ते म्हणाले,""शेट्टींनी विधान परिषदेची आमदारकी स्वीकारलीच पाहिजे. ती त्यांनी नकारावी, असे कारण नाही. खरे तर त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आधी त्यांचा कॉंग्रेसने विचार करायला हवा होता. ते घडत नसेल आणि राष्ट्रवादी हात पुढे करत असेल तर मागे हटायचे कारण काय? संघटनेने अनेकांना अनेक पदे दिली. जे टीका करीत आहेत, त्यांनाही जिल्ह्यातील महत्वाची पदे मिळालीत. ती कोणामुळे मिळाली, याचाही विचार चळवळ करेल. भविष्यात अजून संधी असतील त्या इतरांसाठी असतील. ही वेळ शेट्टींचा आवाज विधान परिषदेत जाण्याची गरज आहे.'' 


ते म्हणाले,""हे करीत असताना त्यांनी लोकसभा मात्र सोडून चालणार नाही. त्यांनी लोकसभा लढलीच पाहिजे. कारण, त्यांची गरज देशाच्या राजकारणात आहेत. ते दिल्लीत गेले पाहिजेत. त्यासाठी विधान परिषदेचा राजीनामा देता येऊ शकेल. सन 2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून संघटना बांधणे आणि सैल पडत चाललेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शेट्टींकडेच पद असणे गरजेचे आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com