Ramdas AthawaleSakal
पश्चिम महाराष्ट्र
Ramdas Athawale : राज्यात महिला अत्याचारात वाढ,रामदास आठवले; महाराष्ट्र भयमुक्त व्हावा
Women Safety : महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री कठोर पावले उचलावीत व अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करण्यात येत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितले.
सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून सुरू असलेल्या वादावरून आठवले यांनी महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे भारत-पाकिस्तान आहेत काय, असा सवाल करत धरणाची उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

