
सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून सुरू असलेल्या वादावरून आठवले यांनी महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे भारत-पाकिस्तान आहेत काय, असा सवाल करत धरणाची उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.