
सांगली, ःपालकमंत्री जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार "घरपोच शिधापत्रिका' मोहीम जिल्हा प्रशासनाने 10 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राबवली. जिल्ह्यातील कुटुबांनीही पालकमंत्री तसेच पुरवठा विभागावर विश्वास दाखवत प्रतिसाद दिला. या काळात संपूर्ण जिल्ह्यातून 35 हजार 429 कुटुंबधारकांनी मोहिमेत अर्ज दाखल केले आहेत. यातील पन्नास टक्के कुटुंबापर्यंत नव्या शिधापत्रिका पोहोचली झालेल्या आहेत. पुरवठा विभागाने कुटुंबांना शिधापत्रिका देण्यासाठी कोल्हापूर शासकीय प्रिंटिंग प्रेसमधून 40 हजार शिधापत्रिका छापल्या आहेत. मात्र कोरोनामुळे मोहीम थंडावली आहे.
जिल्ह्यात शिधापत्रिकांच्या विशेष मोहिमेला "कोरोनाचा ब्रेक' लागला आहे. जिल्ह्यात नव्याने शिधापत्रिकांसाठी 36 हजार 500 अर्ज आले होते. त्यांना मार्च अखेरचे उद्दिष्ट होते. यातील पन्नास टक्के लोकांना अद्याप शिधापत्रिका वाटल्या आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे अन्य लोकांना प्रतीक्षा आहे. गेली दोन महिने पुरवठा विभाग विविध योजनांचे मोफत आणि नियमित धान्य देण्यात व्यस्त आहेत. कोरोना आटोक्यात आल्यानंतरच हा विषय मार्गी लागेल, अशी चिन्हे आहेत.
प्रत्येक नागरिकाला दैनंदिन कामकाजांत आवश्यक कागदपत्रांत शिधापत्रिका महत्त्वाचा पुरावा आहे. शिधापत्रिकांतील नोंदी अद्ययावत असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेतील नोंदी अद्ययावत करणे, आवश्यकतेनुसार नाव कमी करणे व वाढवणे, जीर्ण, खराब तसेच गहाळ शिधापत्रिका बदलून (दुबार), विभक्त शिधापत्रिका देण्यासाठी मोहीम राबवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.