Sangli Citizens Stuck : सांगलीतील ४१ जण आखाती देशांत अडकले; जिल्हा प्रशासनातर्फे नियंत्रण कक्षाची उभारणी, परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू
Gulf War : मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसू लागला आहे. Sangli जिल्ह्यातील तब्बल ४१ नागरिक आखाती देशांत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या तणावामुळे विमानसेवा बंद करण्यात आल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सांगली : मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडाला असून, आखाती देशांत महाराष्ट्रातील अनेक लोक अडकले आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील ४१ लोकांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.