
सांगली, ः राज्यात कृषि दिनानिमित्त "कृषी संजीवनी सप्ताह" साजरा करण्यात येणार असून याकाळात कृषिअधिकाऱ्यांसह, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनविन तंत्रज्ञाना विषयी मार्गदर्शन करणार आहेत. "पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ,' या त्रिसुत्रीचा अवलंब करीत 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कृषि सप्ताह साजरा केला जातो. कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी- कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधीत केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यांना मार्गदर्शन करावे, असे अभिप्रेत आहे.
सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे.
झेडपी, पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. त्यास तालुका स्तरावरील लोकप्रतिनिधी, प्रगतशिल शेतकरी, शेतकरी मित्र, तालुकास्तरीय इतर अधिकारी, आत्माअंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी सल्लागार समितीचे तालुकास्तरीय सदस्य, तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येईल.
बसवराज मास्तोळी,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,सांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.