भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे सांगलीचे नुकसान : आ. कदम

Vishwajeet-Kadam
Vishwajeet-Kadam

सांगली : 'भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील कोट्यवधींचे नुकसान झाले आहे,' असा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी केला.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सांगलीत आज (शनिवार) दुपारी एक वाजता आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. विश्रामबाग चौकातून हा मोर्चा सुरू झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विश्वजित कदम, वसंतदादा शेतकरी कारखान्याचे विशाल पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ब्रह्मनाळ (ता. पलूस) येथील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 

आमदार कदम म्हणाले, महापुराची व्याप्ती प्रचंड होती. पूर परिस्थिती निर्माण होत होती. तरीदेखील जिल्हा प्रशासन गाफील राहिले, असाही आरोप त्यांनी केला. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. ब्रह्मनाळमध्ये दुर्घटना झाली, त्याच वेळी मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते, मात्र, ते ब्रह्मनाळमध्ये आले नाहीत.

'विद्युत पंपांचे पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बदली करावी. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी महापौर सुरेश पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com