

Fresh grapes displayed
sakal
सांगली : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत असली तरी प्रत्यक्षात दरावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. उलट जिल्ह्यात केवळ ३० टक्के द्राक्ष शिल्लक असल्याने आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने दर स्थिर असून पुढील काही दिवसांत वाढीची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत. रमजान महिन्यात मागणी जादा राहिली आहे.