Sangli Market Yard
sakal
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेला जवळपास ७५ वर्षांचा काळ उलटला आहे. शेतमालाला शाश्वत, हक्काची आणि विश्वासार्ह बाजार व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने वसंतदादा पाटील यांनी ही संस्था उभी केली. सांगली हे केंद्र ठेवत दुष्काळी जत व कवठेमहांकाळ या दोन तालुक्यांना विकासाच्या प्रवाहात सोबत घेण्याचा विचार त्यांनी मांडला. तो यशस्वीही झाला. आज या तीन तालुक्यांच्या समितीचे त्रिभाजन झाले आहे. सांगली, मिरजेसाठी ही आनंदवार्ता मानली जात आहे. जत आपत्तीत संधी शोधण्याचा प्रयत्न करेल, तर कवठेमहांकाळ संघर्षातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहील. त्रिभाजनानंतर या तीन समित्यांसमोर नेमकी काय आव्हाने व संधी असतील, याचा वेध घेणारी लेखमालिका...
- विष्णू मोहिते