Sangli: अवकाळीचा द्राक्ष, बेदाण्याला फटका, व्यापाऱ्यांना मात्र द्राक्षे गोडच

संकटांची मालिका कमी की काय, म्हणून आता पलूस तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सलग दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
Bedana Loss
Bedana LossSakal
Summary

संकटांची मालिका कमी की काय, म्हणून आता पलूस तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सलग दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

पलूस - पलूस तालुक्यात पडत असलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सलग तीन-चार वर्षे अडचणीत असलेल्या द्राक्षबागायतदारांचे कंबरडे मोडले असून अवकाळी पावसात सापडलेल्या द्राक्षबागांचे तत्काळ पंचनामे करून शासनाने मदत द्यावी, अशी अपेक्षा द्राक्षबागायतदार व्यक्त करीत आहेत.

यावर्षी द्राक्षबागांना दर्जेदार द्राक्ष आली होती. निदान यावर्षी तरी द्राक्षाचे बऱ्यापैकी पैसे होतील, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. मात्र, यावर्षी परिस्थिती विचित्र आहे. द्राक्षाला प्रति चार किलोस अगदी ८० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. अपेक्षित दर मिळत नसल्याने द्राक्षबागायतदारांच्या यावर्षीच्या हंगामावरही पाणी फिरले आहे.

संकटांची मालिका कमी की काय, म्हणून आता पलूस तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सलग दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस पडत असल्याने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. द्राक्षघडात पाणी साचत असल्याने मणीकुज होत आहे. द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. शिवाय अवकाळी पावसाचा; अर्थात बागायतदारांवर ओढवलेल्या संकटाचा गैरफायदा दलाल व व्यापारी घेत आहेत. अत्यल्प दरात द्राक्षाची खरेदी केली जात आहे. यामध्ये प्रचंड तोटा होत आहे.

सलग एका पाठोपाठ तीन वर्षे तोट्यातच निघाल्याने द्राक्षबागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने यापूर्वी अपेक्षित मदत केली नाही. चालू हंगामात अवकाळीमुळे नुकसान होत आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त द्राक्षबागायतदारांना ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

पेड परिसरात पावसाने बेदाणा भिजला

पेड : परिसरात काल रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. गेले काही दिवस तापमानात वाढ होऊन पारा ३५ अंशापर्यंत गेला होता. दिवसा बाहेर पडणे मुश्कील झाले होते. मात्र काल सायंकाळी सुरवातीला सोसाट्याचा वारा आला. त्यानंतर पावसाला सुरवात झाली. सध्या निसर्गच शेतकऱ्यांच्या मुळावर उठून पिकाचं नुकसान करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पेड परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची द्राक्ष ५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र द्राक्ष उत्पादकांकडून हीच द्राक्ष २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जात आहेत. त्यामुळे याचा लाभ प्रत्यक्षात द्राक्ष उत्पादकांना होत नसून, व्यापारी दलाल व किरकोळ विक्रेते यांना होत आहे. त्यातच द्राक्षाला चांगला दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा करण्याचा निर्णय घेतला. शेडवर टाकण्यात आलेली बेदाणा पावसाने भिजला असून तो काळा पडणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने भिजलेल्या बेदाणा आणि द्राक्षांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

व्यापारी, दलालांना द्राक्ष गोड...

खते, औषधे, पाणीपट्टी, मशागत, मजुरी यांचे दर गेल्या दहा वर्षांत अनेक पटीने वाढले आहेत. मात्र, द्राक्षाचे दर दहा वर्षांपासून बऱ्यापैकी स्थिर आहेत. यामध्ये वारंवार नैसर्गिक संकटांची भर पडत आहे. यामध्ये द्राक्षबागायतदारांना फटका बसत आहे. प्रत्येक वर्षी ‘गोड द्राक्षांची, कडू कहाणी’ बागायतदारांकडून ऐकायला मिळते. मात्र, दुसऱ्या बाजूला व्यापारी, दलालांना द्राक्षांमधून फायदाच फायदा होत आहे. त्यांना द्राक्ष ‘गोड’च आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com