
सांगली ः कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतचे जिल्हा पातळीवरील आदेश आज शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी काढले. येत्या 30 एप्रिलपर्यंत शाळा बंद राहणार आहे. त्यातून दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत अपवाद असेल, असे आदेशात म्हटले आहे.
गेल्यावर्षी 15 मार्च रोजी शाळा बंद झाल्या होत्या. यावर्षी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याआधी शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी परीक्षा न घेता उत्तीर्ण होतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे आठवीपर्यंतच्या शाळांचा आता फारसा मुद्दा राहणार नाही.
नववी आणि अकरावीबाबत काय धोरण राबवले जाणार, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा या महिन्यातच होत आहे. 23 पासून बारावीची आणि 30 पासून दहावीची परीक्षा आहे. या आदेशातून या दोन्ही परीक्षांना वगळण्यात आले आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून या परीक्षा होणार हे जवळपास स्पष्ट आहे.
आता जिल्ह्यातील सर्वच शाळा बंद करण्याचे आदेश आल्यामुळे उद्यापासून विद्यार्थ्यांना विश्रांती मिळणार आहे. या काळात गृहपाठ करून घेणे, ऑनलाईन शिक्षण, लिंक पाठवून पेपर सोडवून घेणे असे उपक्रम सुरु राहणार आहेत. महिनाभर शाळा व्यवस्थित सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहत होता, मात्र आता पुन्हा शाळा बंद ठेवाव्या लागणार असल्याने ते हिरमुसले आहेत.
काही शाळांमध्ये शिक्षक कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनापुढेही आता पर्याय राहिलेला नाही. या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण दक्षता घ्यावी, कोरोना बाबतची दक्षता घ्यावी, उन्हाळा तीव्र होत असताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.