

सातारा : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आजही (साेमवार) त्यात 22 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 538 झाली. कोरोना बाधित मृतांचा आकडा 21 पर्यंत गेला आहे. एकूण 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण वाढत असतानाच 40 कोरोनाग्रस्त बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील चार संशयितांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह 219 जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज 22 जणांची भर पडली. त्यामध्ये फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळेतील 35 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील कावडीमधील 52 वर्षीय महिला, कळकोशीतील 41 वर्षीय पुरुष, केळघरमधील (सोळशी) 39 वर्षीय महिला, कऱ्हाड तालुक्यातील विंग येथील 43 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुण, पाटण तालुक्यातील काळेवाडीतील 21 वर्षीय महिला, नवसरेवाडीमधील 60, 25 व 22 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील अंभेरीतील 3 व 6 वर्षीय बालिका, 29 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला व 63 वर्षीय पुरुष, गोरोशीतील 72 वर्षीय महिला, कोट्रोशीमधील दहा वर्षीय मुलगी व वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक, वोव्हाळीतील 42 वर्षीय पुरुष व जांभळीमधील 11 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये मुंबईवरून आलेल्या व घरीच क्वॉरंटाइन असलेल्या व रक्तदाबाचा त्रास असलेली बोपेगाव (ता. वाई) येथील 85 वर्षीय महिला, "सारी'ने आजारी असलेली गिरवी (ता. फलटण) येथील 65 वर्षीय महिला, कॅन्सरने 15 वर्षांपूर्वीपासून आजारी असलेले व मुंबईहून आलेले 52 वर्षीय पुरुष, तसेच रांजणी (ता. जावळी) येथून आलेल्या 85 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दिवसभरात 237 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
कोरोनाबाधित व मृत्यूंची संख्या वाढत असताना कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात वाढत आहे. आजही तब्बल 40 जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये सकाळच्या सत्रात कृष्णा हॉस्पिटलमधील 19, तर सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील 5, सह्याद्री हॉस्पिटलमधील 5, रायगावातील सेंटरमधील 2, खावलीतील सेंटरमधील 4 जणांचा समावेश आहे. रात्री पार्लेतील सेंटरमधून 5 जणांना सोडण्यात आले. आत्तापर्यंत 200 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 237 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 14 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
रेशनिंग दुकानदारांचा ठाकरे सरकारला दणका; धान्य वाटप बेमुदत बंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.