शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थिसंख्या घटतेय

Scholarship
Scholarship

सोलापूर - राज्यात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०१७ पासून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. २०१५ च्या तुलनेत २०१८ मध्ये विद्यार्थिसंख्येत सात लाख २८ हजार १५८ ने घट झाली.   

राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना सरकारने १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली आहे. ही परीक्षा २०१५ पर्यंत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती. पण, २०१७ पासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुरू केली. राज्यात पाचवी व आठवीचे वर्ग हे खासगी माध्यमिक शाळांना जोडले आहेत, त्यामुळे खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षक या परीक्षेला विद्यार्थी बसविण्यास टाळाटाळ करत असल्यानेच विद्यार्थी संख्या घटली आहे. या परीक्षेचे विद्यार्थ्यांचे शुल्क राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, परभणी, लातूर या १० जिल्हा परिषदा व मुंबई, उल्हासनगर, पुणे, पिंपरी- चिंचवड या चार महापालिका भरतात, तरीही या परीक्षेमध्ये शाळांचा सहभाग नसणे ही बाब गंभीर असल्याने चिंता होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com