आमदार जयंत पाटील मंत्री असताना एकही काम जिल्ह्यात केले नाही. दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची टीका आमदार पडळकर यांनी केली होती.
सांगली : ‘‘आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा यापुढे महिला आघाडीतर्फे जशास तसे उत्तर दिले जाईल,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनी दिला. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या.