

Historical Footprints
sakal
...ही भूमी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाची !
मिरजेसह अनेक गावांचा शिवसाधनांमध्ये उल्लेख आजचे सांगली जिल्ह्याचे भूक्षेत्र हा शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा भाग. त्यामुळे शहाजीराजे ते छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढ्यांचे राजे सांगलीच्या भूभागात आल्याच्या नोंदी आढळतात. जिल्ह्यातील मच्छिंद्रगड, प्रचितगड आणि भूपाळगड किल्ले तर स्वराज्याचा भाग होते. या किल्ल्यांवरील लढायांची वर्णने उपलब्ध आहेत.