`या ` पाच महापालिकांतील प्रभाग रचनेची प्रक्रिया निश्चित

`या ` पाच महापालिकांतील प्रभाग रचनेची प्रक्रिया निश्चित


सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील पाच महापालिकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. बहुसदस्यीय एेवजी आता एकसदस्यीय पद्धतीने रचना केली जाणार आहे. रचना कशी करावी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी तब्बल 43 पानांचे सर्क्युलर काढले असून, प्रभाग रचनेपासून आरक्षण कसे काढावे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभाग रचनेचे असतील असे टप्पे
प्रारुप प्रभागांची रचना करणे, चक्रानुक्रमे आरक्षण फिरवण्यासाठी गत निवडणुकीतील आरक्षण निश्चित करणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण निश्चित करणे, प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता घेणे, नागरीकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढणे, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणी घेणे, अंतिम प्रभाग रचना तयार करणे व त्यास मंजुरी घेऊन प्रसिद्धी देणे.

असे होईल आरक्षण निश्चित
आरक्षण चक्रानुक्रमे निश्चित करण्याच्या निर्णयापासून नवी मुंबई, अौरंगाबाद, कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर या महापालिकांची चौथी तर वसई-विरारची तिसरी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी 2005, 2010 आणि 2015 या वर्षांत या संबंधित महापालिकांमध्ये असलेल्या प्रभागांचे आरक्षण पाहून नवीन आरक्षण निश्चित केले जाणार आहे.  

या पाच महापालिकांत होत आहेत निवडणुका
नवी मुंबई, अौरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यापूर्वी या महापालिकांमध्ये
बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com