
सांगली- जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपीट, वादळी पावसामुळे 550 एकरावरील द्राक्ष, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यात द्राक्षच्या पिकलेल्या काडांची पाने गळून पडली आहे. भविष्यात ही काडी पक्क न झाल्याने मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागणार आहे. बुधवारी ( ता. 3) आणि गुरुवारी ( ता. 4) जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. कृषी विभागाकडून पंचनामे गतीने सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलका पाऊस झाला.
रविवारी दुपारी दीड ते सायंकाळी चारच्या वेळेत या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात पक्क झालेल्या द्राक्ष काड्यांना मोठे नुकसान झाले आहे. 450 एकरावरील काड्यांची पानेच गळून पडली आहेत. परिणामी काड्या पक्क न होता. भविष्यात फळधारणा न होण्याची भीती आहे. द्राक्ष व भाजीपाल्याचे अत्यंत नुकसान झालेले आहे. या शिवाय 50 एकरावरील ऊसाचेही नुकसान झालेले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तिन्ही तालुक्यात कृषी सहाय्यक, तलाठ्यांकडून पिकांचे पंचनामे सुरु केले असून दोन दिवसात पंचनामे अंतिम होणार आहेत.
विद्युत पुरवठा होवू शकतो खंडीत...
हवामान खात्याने दिलेल्या धोक्यांच्या इशाऱ्यानुसार कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघर येथे चक्री वादळाची शक्यता आहे. याच काळात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता असून या काळात विद्युत पुरवठा दिर्घ काळ खंडीत होण्याचीही शक्यता आहे. या पार्ष्वभूमिवर ग्राहकांनी सर्व ती उपाय योजना करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.