
सोलापूर : गाडी चालविताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्या नऊ ते दहा हजार वाहनचालकांना सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी समन्स बजावले आहे. तर समन्स बजावून देखील राष्ट्रीय लोकअदालीवेळी गैरहजर राहिलेल्या १३०० चालकांना वॉरंट काढण्यात आले आहे. वाहनांवरील दंड न भरल्याने पोलिसांनी ही ॲक्शन घेतली आहे.