Indurikar Maharaj Kirtan : "आज माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत..."; अक्कलकोटमध्ये इंदुरीकर महाराजांनी समाजाच्या वास्तवतेवर ओढले सडेतोड आसूड

Indurikar Maharaj Akkalkot Ashadhi Ekadashi Kirtan : अक्कलकोट येथे गुरुपौर्णिमा महोत्सवात इंदोरीकर महाराजांनी हरिनाम, संतांचे महत्त्व, आई-वडिलांचा सन्मान आणि अहंकाराचा त्याग यावर प्रभावी कीर्तन करत हजारो भाविकांना आध्यात्मिक संदेश दिला.
Indurikar Maharaj Akkalkot Ashadhi Ekadashi Kirtan

Indurikar Maharaj Akkalkot Ashadhi Ekadashi Kirtan

esakal

Updated on

अक्कलकोट शहर : कर्माला माफी नाही. या कलियुगात संतांशिवाय माणूस सुखी होणार नाही. जगाला सुखी व्हायचे असेल, तर हरीनामाशिवाय पर्याय नाही. मीपणा आणि अहंकारामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. त्यापासून दूर राहिल्यास आनंद आणि समाधान (Gurupournima Mahotsav Akkalkot 2026) लाभते. आई-वडील आणि संत हेच जीवनातील खरे मार्गदर्शक असून, आजच्या युगात माणसापेक्षा पैशाला अधिक किंमत मिळत असल्याने माणुसकी हरवत चालली आहे, असे परखड प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार व धर्मप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com