निकाल लागून दोन वर्ष उलटली तरी, राज्य कर निरीक्षकांना अद्याप नियुक्ती नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या एस ई बी सी आरक्षणाच्या निकालाच्या अनुषंगाने निकाल सुधारित करून त्यानुसार शिफारस पत्र देणे पात्र उमेदवारांना अपेक्षित होते.
MPSC Exam
MPSC ExamSakal

उपळाई बुद्रूक : एकीकडे कोरोना दुसरीकडे वाढत चाललेले वय, त्यात घरची आर्थिक हलाखीची परिस्थिती. त्यात इतर नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे देखील हातात नसल्याने, भावी कर निरीक्षक अधिकारी मानसिक तणावाखाली असुन, शासनाच्या उदासीन भुमिकेमुळे दोन वर्षे उलटूनही अद्याप राज्य कर निरीक्षक अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली नसुन, हे 'भावी कर निरीक्षक अधिकारी' नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

MPSC Exam
५० टक्के रक्कम भरा, कृषीपंपाचं वीजबिल माफ

राज्य कर निरीक्षक या पदाची जाहिरात जानेवारी 2019 मध्ये जाहीर करून डिसेंबर अखेरपर्यंत या पदाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता. या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी इतर नोकरीचा राजीनामा देऊन या पदाच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना. अचानक आलेल्या महामारीमुळे व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणाच्या स्थगितीमुळे दिलेल्या नियुक्ती रद्द करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या एस ई बी सी आरक्षणाच्या निकालाच्या अनुषंगाने निकाल सुधारित करून त्यानुसार शिफारस पत्र देणे पात्र उमेदवारांना अपेक्षित होते. कारण आयोगाने इतर सर्व परीक्षांचे निकाल सुधारित करून पुढील कारवाई केलेली आहे. परंतु राज्य कर निरीक्षक 2019 पदाचा निकाल अद्यापही सुधारित केला गेलेला नाही.

MPSC Exam
तक्रार करायची असेल तर ५० टक्के शुल्क भरा, शालेय शिक्षण विभागाचा आदेश

उमेदवारांनी शासनस्तरावर विचारणा केली असता, सुधारित निकाल आयोगाकडे पाठवल्याचे समजले. परंतु तांत्रिक त्रुटींमुळे शासनाकडे पुन्हा अभिप्रायासाठी पाठवले असल्याचे उमेदवारांना सांगितले जात आहे. इकडून तिकडे, तिकडून इकडे हे चालु असल्याने पात्र उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत निवड झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुधारित निकाल लवकरात लवकर जाहीर करून तात्काळ नियुक्ती देणे बाबत पत्रव्यवहारही केला आहे.

राज्य कर निरीक्षक पदासाठी निवड झालेले उमेदवार हे सामान्य कुटुंबातील असून, नोकरी करत त्यांनी या परीक्षेत यश संपादन केलेले आहे. पदासाठी निवड झाली नंतर कागदपत्रांची ही तपासणी झाल्याने, गेली दोन वर्षापासून इतर ठिकाणच्या नोकरींचाही त्यांनी राजीनामा दिलेला आहे. गेली दोन वर्षापासून हाताला काम नसल्याने, आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावत चालल्याने, अधिकारी होऊन देखील, बेरोजगारीच्या खाईत जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या उमेदवारांना नियुक्त्या द्यावेत अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com