Pandharpur : चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम ‘नमामि चंद्रभागा’तून हाती घेण्यात आले असून तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात.
chandrabhaga
chandrabhaga sakal

‘नमामि गंगा’च्या धर्तीवर लाखो विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम ‘नमामि चंद्रभागा’तून हाती घेण्यात आले. अनेक वर्षांपासून सांडपाणी आणि अस्वच्छ पाणी मिसळल्याने चंद्रभागा (भीमा) नदी प्रदूषित झाली. यासाठी चंद्रभागा नदीकाठावरील १२० गावांमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन’मधून शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामे होणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यातील कामे अपूर्णच असून आता तिसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने ‘नमामि चंद्रभागा’ अभियान ठप्प असल्याची वस्तुस्थिती आहे.

chandrabhaga
PM Modi Solapur Visit: पंतप्रधान मोदी आठवड्याभरात दुसऱ्यांदा राज्याच्या दौऱ्यावर; जगातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे करणार लोकार्पण

विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकऱ्याच्या मोठी नाराजी होती. त्यांना अस्वच्छ पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच पाणी तोंडात घ्यावे लागते.

chandrabhaga
Solapur News : सोलापूरच्या गारमेंट उद्योजकांमध्ये देशाच्या सैनिकांसाठी गणवेश तयार करण्याची शक्ती

प्रशासनाने ‘नमामि चंद्रभागा’तून शुद्धीकरणाचे काम पुन्हा हाती घेतल्याने लाखो वारकऱ्यांना चंद्रभागेच्या शुद्ध पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारणतः १२० गावे आहेत, ज्याचे सांडपाणी नदीत मिसळते. या नदी काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये, त्या गावांमध्ये शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन ही कामे होणार आहेत. मात्र, पहिल्या दोन टप्प्यात मंजुरी मिळालेली कामे अजूनही १०० टक्के पूर्ण झालेली नाहीत हे विशेष.

तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

‘नमामि चंद्रभागा’साठी स्वच्छ भारत मिशन व नमामि चंद्रभागा अभियानाअंतर्गत निधी अपेक्षित आहे. ‘नमामि चंद्रभागा’साठी विभागीय आयुक्त स्तरावर स्वतंत्र समिती आहे. त्यांच्याकडून तिसऱ्या टप्प्याला तातडीने मान्यता मिळावी अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

त्यांचा विभागीय आयुक्तपदाचा कार्यकाळ काही महिनेच राहिला आहे. त्याठिकाणी नवीन अधिकारी आल्यानंतर पुन्हा त्यांना अभियानाचा अभ्यास करून मंजुरी देण्यास विलंब होवू शकतो, अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त श्री. राव आता तिसऱ्या टप्प्याला कधीपर्यंत मंजुरी देतात आणि चंद्रभागा पूर्णत: स्वच्छ कधीपर्यंत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com