
मंगळवेढा - महायुती सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. मात्र सहा महिन्यानंतर देखील अद्यापही रोजगार सेवक मानधनाच्या प्रतिक्षेतच आहेत. मानधनाची रक्कम जमा झाली नसल्यामुळे रोजगार सेवकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.