अजूनही शेतात पाणी अन्‌ चिखल; रब्बीची पेरणी कशी करायची? शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्‍न 

Chapalgaon
Chapalgaon

चपळगाव (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगाव व परिसराला परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी कशी करायची, असा प्रश्न काही शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 

पावसाने झोडपले, राजाने छळले तर दाद कोणाकडे मागायची? अशी वास्तविक परिस्थिती या वर्षी शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. कधी अत्यल्प पाऊस, कधी अवेळी पाऊस, कधी दु:ष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा संकटांच्या चौकटीत अक्कलकोट तालुक्‍यातील शेतकरी सापडला आहे. पेरणीच्या हंगामात जवळ पैसे नसतानाही कर्ज काढून बी - बियाणे व खते खरेदी करून पेरणी करतो. तणनाशक व कीटकनाशकांची फवारणी करतो. पण नैसर्गिक संकटामुळे म्हणा किंवा उत्पादित पिकाला योग्य दर न मिळाल्याने म्हणा, शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा कमी न होता वाढतच आहे. त्यामुळे कृषिप्रधान देशातील शेतकरी खचला आहे. 

सध्या रब्बी पेरणीचा हंगाम आहे. पण परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतात तण वाढलेले आहे. पाऊस थांबून दहा दिवस झाले तरी रानात चिखल व रानं जलमय असल्याने अजून वीस - पंचवीस दिवस तरी रब्बी पेरणी करता येत नाही. पेरणीला उशीर झाल्याने पेरलेले पुढे उगवेल की नाही अशीही चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. आघाडी सरकारने जिरायतीसाठी हेक्‍टरी दहा हजार व बागायतीसाठी हेक्‍टरी पंचवीस हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. हेक्‍टरी अनुक्रमे पंचवीस व पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी, दीपावलीच्या पूर्वी ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com