माढा - परतीच्या दमदार पावसामुळे माढा तालुक्यातील रब्बी हंगामातील पेरण्यांच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. .माढा तालुक्यामध्ये परतीचा पाऊस सध्या सर्वदूर पडत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर माढा तालुक्यामध्ये सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. रब्बी हंगामापूर्वी हा दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत..मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पेरण्या केल्या. मात्र जुन-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके मोठ्या प्रमाणावर पाण्याअभावी करपून वाया गेली..थोडीफार हाताशी आलेली पिके काढणी योग्य झाली. मात्र ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे काढणीस आलेली पिकेही हातची निघून गेली. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याने खरीप हंगाम माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या होऊनही वाया गेलेला आहे..आता पुन्हा रब्बी हंगामाच्या तोंडावरती दमदार पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे शेतकऱ्याच्या अशा पल्लवी झाल्या असल्या तरी खरीप हंगामात पिके हातची वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याला पुन्हा पैशाची जमवाजमव करावी लागणार आहे..पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम वाया गेला असून रब्बीच्या पेरण्यानंतर तरी पावसाचा लहरीपणा कमी होतो की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे या दमदार पावसानंतर शेतकरी कितपत पेरणीकडे वळणार हा प्रश्न आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.