Solapur News : ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक नेमावा; अखिल भारतीय सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Gram Panchayat Administration : राज्यात हजारो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जात असून यामुळे विकासकामे ठप्प होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरपंचांनाच प्रशासक नेमावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेनं दिला आहे.
All India Sarpanch Parishad’s Demand to Chief Minister

All India Sarpanch Parishad’s Demand to Chief Minister

sakal
Updated on

कुर्डू (सोलापूर) : राज्यात सध्या २ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात आणखी १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींवर सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात यावे, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com