Bhagirath Bhalke : नानाच्या स्वप्नपूर्तीसाठी विधानसभा निवडणूक आर या पार पद्धतीने खेळणार

स्व. भारतनानांनी पाहिले ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक आर या पार पद्धतीने मी खेळणार असल्याचा सुचक इशारा बीआरएस नेते भगीरथ भालके यांनी दिला.
Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalkesakal

मंगळवेढा - तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी जे स्वप्न स्व. भारतनानांनी पाहिले ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक आर या पार पद्धतीने मी खेळणार असल्याचा सुचक इशारा बीआरएस नेते भगीरथ भालके यांनी दिला.

स्व. आ. भारत भालके यांच्या 64 वी जयंती व त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती भुजंगराव पाटील हे होते, यावेळी दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, डॉक्टर प्रणिता भालके, जेष्ठ नेते रामचंद्र वाकडे, अजित जगताप,मुरलीधर दत्तू, मारुती वाकडे, ज्ञानेश्वर भगरे, प्रवीण खवतोडे, दयानंद सोनगे, बसवराज पाटील, नितीन पाटील, शंकर माळी सतीश कट्टे, भारत नागणे, गुलाब थोरबोले, संतोष सोनगे, काका डोंगरे, अशोक माने, परमेश्वर लेंडवे, अजित यादव यांच्यासह भालके समर्थक उपस्थित होते.

यावेळी बोलताना भालके म्हणाले की, विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मला लाखापेक्षा अधिक मते मिळाली. मात्र, या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तयार आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ अनुशेष च्या नावाखाली पाणी मिळत नव्हते. मात्र निवडणुकीनंतर स्व. नानांनी पाणी कागदावर आणून दाखवण्याचे काम केले.

त्यांच्या अकाली निधनानंतर देखील या पाण्यासाठी मी प्रयत्न केले पाणी योजना मंजूर आहे की नाही हेच समोर येत नाही. अजून एक थेंब देखील तालुक्याला मिळाला नसताना देखील फुले उजळण्याचा कार्यक्रम घेतला गेला. तालुक्यातील विषबाधेचा प्रश्न विधानसभेत न मांडता मुंबईतील विषबाधाचा प्रश्न विधानसभेत लोकप्रतिनिधीकडून मांडला गेला.

या पुढील तालुक्यातील जनतेला होणाऱ्या अडवणुकीबाबत वाचा फोडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ताकद कशी वापरायची हे देखील याचे आपल्याला ज्ञान असून बीआरएस चा आदेश येईपर्यंत मी मोकळा आहे. भविष्यातही तुमच्या कामासाठी तुमच्या सोबत कायम राहणार आहे. यावेळी अजित जगताप यांनी निवडणुकीपूर्ती राजकारण करणारे स्व. भालके होते.

सामान्य कुटुंबातून येऊन देखील वेगवेगळ्या पक्षातून तीन निवडणुका लढवून ते लोकाबरोबर राहिले सध्याच्या काळात प्रश्नासाठी होणाऱ्या आडवणूकी बाबत या पुढील काळात आपण बोलणार आहे. यावेळी रामचंद्र वाकडे, सतीश कट्टे, यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अजित यादव यांनी तर आभार गुलाब थोरबोले यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com