

Solapur
esakal
हुकूम मुलाणी
मंगळवेढा: पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यातील खरीप पेरणी संकटात आली असून सध्या तालुक्यात फक्त 11 टक्केच पेरणी झाली.जनावराच्या चारासह पिण्याच्या पाण्याचा व रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे मात्र याकडे प्रशासनाने अद्याप गांभीर्याने घेतले नसल्याचे सध्यातरी चित्र आहे. निसर्गाने डोळे वटारले असले तरी प्रशासनाचे डोळे मात्र कधी उघडणार असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी वर्गातून विचारला जात आहे