District officials launching Asmita Abhiyan in Solapur to benefit 13,500 Divyang persons under 21 inclusion schemes.Sakal
सोलापूर
Solapur News: साडेतेरा हजार दिव्यांग येणार मुख्य प्रवाहात! साेलापूर जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत २१ योजनांचा लाभ
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांगासाठी प्रमाणपत्र अनिवार्य असून केंद्र शासनाची स्वावलंबन प्रणाली (युडीआयडी कार्ड) यासाठी वापरण्यात येते. जिल्ह्यातील हजारो दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यात आली.
सोलापूर : जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेने जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना २१ प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा करून झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील साडेतेरा हजार दिव्यांग मुख्य प्रवाहात येणार आहेत.