

Pandharpur News
esakal
पंढरपूर: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर १५ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार असून, १६ जुलैपासून ही व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. यात्रा काळात भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.