Solapur News : आरोग्य मंत्र्याच्या जिल्हातच ग्रामीण रुग्णालय सलाईनवर, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असून अनेक आजारी रुग्णाला सेवे अभावी ताटकळत बसावे लागत आहे.
rural healthcare access at risk as public health efforts become politicized solapur
rural healthcare access at risk as public health efforts become politicized solapurSakal

ब्रह्मपुरी(सोलापूर) : मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार असून अनेक आजारी रुग्णाला सेवे अभावी ताटकळत बसावे लागत आहे.त्यामुळे ओपीडी, अंतररुग्ण विभाग, विविध प्रकारचे सेवा, वैद्यकीय दाखले देण्यात डॉ पद्माकर अहिरे दिरंगाई करीत असून रुग्णांना त्याचा मानसिक त्रास सोसावा लागत आहे तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नेमणूक करण्याची मागणी जनतेतून होत आहे .

वैद्यकीय क्षेत्रामध्ये आरोग्य विभाग हा महत्त्वाचा भाग मानला जातो .शासन आरोग्य विभागावर कोट्यावधी रुपये खर्चून सामान्य जनतेला उपचार मिळावा हा येतो साधत असला तरी वैदिकिय अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामीण रुग्णालयतील वैद्यकीय अधिकारी मुळे बदनाम होत असून विविध प्रकारच्या सेवा देण्यास नकार देऊन टाळाटाळ करीत आहे.

ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ पद्माकर अहिरे यांची नेमणूक काही महिन्यापूर्वीच केली होती. परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णास विविध प्रकारच्या अद्यावत सेवा द्यायच्या सोडून अनेक अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ.अहिरे हे आपल्या वेळेत हजर नसतात, कधीही येणे जाणे ,उपलब्ध नसणे,उशिरा येणे, मृतावर शवविच्छेदन करण्यास विलंब करणे ,रुग्णास त्रास देणे, ओपीडी विभागात सतत गैरहजर राहणे, तसेच योग्य प्रकारच्या सेवा न देणे,

आरोग्य कर्मचारी वर्गास त्रास देणे आदी बाबीवरून आरोग्य विभाग सलाईन वर असून बुस्टर डोस देण्याची गरज आहे.त्यामुळे विविध कारणांमुळे ग्रामीण रुग्णालय बदनाम होत आहे .तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ पद्माकर अहिरे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी तालुका व शहर भागातून जनतेने केली आहे.

ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे शहरी व ग्रामीण भागातून अनेक रुग्ण येत असतात परंतु वैद्यकीय अधिकारी हेच वेळेवर येत नसल्यामुळे उपचार करण्यास विलंब होत आहे. ओपीडी विभागाची गर्दी पाहता वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णास विविध प्रकारच्या सेवा न देता रुग्णास ताटकळत बसावे लागत आहे.

तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या दाखल्यासाठी सततचे हेलपाटे मारावे लागत आहे त्यामुळे रुग्णास आर्थिक व मानसिक त्रास होत असून सदर ग्रामीण रुग्णालयांमध्ये अपुऱ्या असलेल्या कर्मचारी यांची विविध पदांची भरती करून चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी सततची होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यामुळे मनमानी कारभारामुळे ग्रामीण रुग्णालय बदनाम होत आहे. त्यामुळे इतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्याचा कामाचा त्रास सहन करावा लागत असून रुग्णास त्याचा नाहक त्रास होत आहे.

आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यातच आरोग्य विभाग कोमात असून या कडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. तरी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक व आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करून ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णालयास सर्व सुविधा मिळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.

"मी सकाळी मेडिकल फिटनेसला आलो होतो परंतु माझे सर्व तपासण्याचे रिपोर्ट्स तयार असतानाही संध्याकाळ पर्यंत ताटकळत बसावे लागले. सतत हेलपाटे मारून याचा मानसिक त्रास रुग्णांस सोसावा लागत आहे."

- ईलाही इनामदार, ब्रह्मपुरी

" आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी यांना प्रमोशन मिळाल्यास ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या अडचणी पाहता चांगला वैद्यकीय अधीक्षक मंगळवेढा येथे कायमस्वरुपी देऊ ."

- डॉ.सुहास माने , जिल्हा शल्यचिकित्सक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com