
राज्यात सर्वांत मोठी साखर कारखानदारी असलेला जिल्हा, केळी उत्पादनामध्ये जळगावला मागे टाकत घेतलेली आघाडी, गारमेंट उद्योगात सुरू असलेली झटपट वाटचाल, डाळिंब, द्राक्ष फळपिकांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगामध्ये सुरू असलेले नवनवीन प्रयोग, उजनी धरण, पंढरपूर, अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन आणि धार्मिक अर्थकारणात सोलापूरचा असलेला ठसा, मालदांडी ज्वारी, फूड इंडस्ट्री अशा एक ना अनेक गोष्टी सोलापूरचा ब्रँड राज्यात गाजविणाऱ्या आहेत. हा ब्रँड आणखी चकाकत ठेवायचा असेल तर ‘वसा जनसेवेचा’ या तत्त्वावर राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये आणखी जोमाने काम होण्याची आवश्यकता आहे.