

सोलापूर : यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परीक्षा दिली आहे, त्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेले दाखले व कागदपत्र वेळेत व सहजपणे मिळणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात यावर्षी विशेष कॅम्प घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी महसूल प्रशासनाने केलेल्या या नियोजनामुळे विद्यार्थी व पालक यांची मोठी धावपळ वाचणार आहे.