Solapur : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे स्वेच्छा निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर नव्या जिल्हाध्यक्षांचा शोध
Baliram Sathe
Baliram Sathesakal

सोलापूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम साठे यांनी आपण राजकीय निवृत्ती घेण्याच्या मानसिकतेत आहोत, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून आपणास मोकळे करावे, अशी मागणी करणार आहोत, मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही. असे बळीराम साठे यांनी आज ता. ८ रोजी सांगितले.

वय झाले आहे, तब्येत साथ देत नाही, मी कंटाळलो आहे, त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून रिकामी होण्याचा विचार आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आपल्या बाबतीत राष्ट्रवादी मधील श्रेष्ठ निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान बळीराम साठे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यास, त्यांचा उत्तराधिकारी होण्यासाठी इच्छुकांचे पुन्हा प्रयत्न सुरू होणार आहेत, जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक आपल्या गाॅडदारांकडे फिल्डींग लावणार आहेत. शिवाय साठे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास, या पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर या पदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेऊन तशी चाचपणी करावी लागणार आहे.

विशेषत्वे, काही महिन्यांपूर्वी बळीराम साठे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरून वादळ उठले होते, या पदावर जाण्यासाठी इच्छुकांनी मोठे लाॅबिंग सुरू ठेवले होते. दरम्यान पक्षश्रेष्ठींनी आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत श्री साठे हेच या पदावर राहतील असे घोषित केले होते त्यामुळे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या माहोलाच उठलेली राळ खाली बसली होती.

तथापि, आता श्री साठे यांनीच आपण जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून बाजूला होणार आहोत, असे सांगितल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या बदलाचे वारे जोरदारपणे घोंगावणार आहे.

पाटील, सांळुंखे- पाटील ही नावे पुन्हा चर्चेत

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदासाठी यापूर्वी या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आणि सध्याचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील तसेच माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील आदींची नावे चर्चेत होती, शिवाय तत्कालीन वेळी त्यांनी तशी फिल्डिंग ही लावली होती. बळीराम साठे यांनी जिल्ह्याक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा उमेश पाटील, दीपक साळुंखे- पाटील यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत येतील.

राजकीय स्वेच्छानिवृत्ती आडून साठेंचे वेगळी खेळी ?

बळीराम साठे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासह राजकीय सेवानिवृत्ती घेण्याचा विचार बोलून दाखविला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून बाजूला होऊन त्यांना भाजपचे 'कमळ' हातात वगैरे घ्यायचे आहे का ? असाही तर्क जाणकारांकडून केला जातोय.

कारण श्री साठे यांचे अत्यंत निकटवर्तीय मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त १९ फेब्रुवारीचा ठरल्याचे निश्चित मानले जाते. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर, काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोठे वादळ उठले होते.

तेव्हा राजन पाटील आणि बळीराम साठे हे दोघेही राष्ट्रवादीमधील कुरघोड्यांना कंटाळून भाजपाचे 'कमळ' हाती घेणार अशी हवा झाली होती. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आणि राजकीय स्वेच्छानिवृत्ती यावर सर्वांचे लक्ष विचलित करून भाजपात जाण्याचा साठे यांचा 'व्होरा' असावा, वेगळी खेळी असावी असाही अंदाज बांधला जात आहे.

राजन पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित, पण मी जाणार नाही

माजी आमदार राजन पाटील माझे निकटवर्ती आहेत, अनगकरकर पाटील परिवाराशी माझे स्नेह संबंध आहेत. पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे मी मात्र भाजपात जाणार नाही असे स्पष्टीकरण स्पष्टीकरण श्री साठे यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com