

Despite 51% water storage in Ujani Dam, delayed rainfall has intensified the irrigation crisis across drought-hit regions.
Sakal
मंगळवेढा : उजनी धरणामध्ये सध्या ५१ टक्के पाणीसाठा झाला असून सोलापूर जिल्ह्यात पाऊस न झाल्यामुळे उसासह सर्व पिके जळू लागली आहेत. यामुळे पाटबंधारे विभागाने उजनी धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.