Former MP ranjitsinh naik nimbalkar
sakal
सांगोला - सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक पाचच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फाटा क्रमांक पाचला पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मंगळवार (१८ ऑगस्ट)पासून निश्चितपणे पाणी सोडण्यात येईल. मंगळवार किंवा जास्तीत जास्त बुधवारपर्यंत पाणी न आल्यास आपण आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांसोबत आंदोलन करू, असा इशारा माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.