
सोलापूर : उजनी धरणातून शेतीसाठी आज कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात केली. आज पहाटे चार वाजता कालव्यातून 400 क्युसेक ने पाणी सोडले जात होते. हळूहळू हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 800 क्युसेकने पाणी सोडले जात होते. पुढील महिनाभर हे आवर्तन शेतीसाठी सुरू राहणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज काळे यांनी सकाळ'ला दिली.
मागील आठवड्यात सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदी मध्ये सोडलेले पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला होता. त्याच वेळी श्री साळे यांनी एक मेपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज पहाटेपासून कालव्यातून विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे.
धरणात सध्या उपयुक्त ११ टक्के इतका आहे. महिनाभर कालव्यातून पाणी सोडायचं म्हटल्यानंतर जवळपास सात टीएमसी एवढे पाणी लागते. पण या महिनाभरात पाच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे आहे. पुढील 13 ते 14 मेच्या दरम्यान धरण शून्य पातळीवर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर वजा पाच टक्क्यांपर्यंत धरणातील पाणीसाठा या महिन्याभरात जाऊ शकतो असेही श्री साळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.