सोलापूर : राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांचे नेतृत्व तयार व्हावे या उद्देशाने तत्कालीन युती सरकारने 27 वर्षांनंतर महाविद्यालय व विद्यापीठ निवडणुकीचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठांना पत्रही पाठविण्यात आले मात्र, राज्यातील महापूर व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करुन या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. परंतु, त्यानंतर शासन स्तरावरुन काहीच निर्णय न झाल्याने या निवडणुकांचा मुहूर्त हुकला आहे.
आवश्य वाचाच...उपळाईच्या अनिता राज्यात प्रथम
राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या निवडणुकांची विद्यार्थी संघटनांनी जोरदार तयारीही केली. मात्र, राज्यातील महापूर, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता यासह अन्य कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. पुणे, सोलापूर, मुंबईसह अन्य विद्यापीठांसह त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी मतदार यादीही तयार केल्या. बॅलेट पेपर होणाऱ्या या निवडणुका पुढे ढकलल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुकांच्या निकालाचा परिणाम विधानसभेवर होऊ नये या कारणाने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. डिसेंबरपर्यंत या निवडणुका होतील, असा विश्वास बाळगलेल्या विद्यार्थी संघटनांची अपेक्षा फोल ठरली आहे.
हेही वाचाच...अरे वा...! सर्वात तरुण न्यायाधीश होण्याचा मान तोळणूरच्या आयेशाला
ठळक बाबी...
- विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हुकला महाविद्यालयीन निवडणुकांचा मुहूर्त
- 27 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचे स्वप्न राहीले अपुरे : पुढे ढकलेल्या निवडणुकांचा निर्णय नाही
- राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांनी केली होती निवडणुकांची तयारी
- तत्कालीन सरकारने घेतलेला निर्णय महाविकास आघाडी कायम ठेवणार का : विद्यार्थी संभ्रमात
हेही वाचाच...धक्कादायक 'या' शहरातील कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थी असुरक्षित !
तयारी पूर्ण मात्र, शासन निर्णय नाहीच
उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयीन व विद्यापीठ निवडणुका घ्याव्यात असे पत्र दिले. मात्र, काही दिवसांनी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे नोव्हेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय झाला. त्यानुसार सोलापूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांनी संपूर्ण तयारी केली होती. परंतु, पुढे काहीच निर्णय झाला नाही.
- डॉ. व्ही. बी. घुटे, कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ |
|