Sangli : महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ

खंडित विजेच्या खेळखंडोब्यामुळे कळंबी परिसरातील पिके गेली वाळून
sangli
sangli sakal

विटा : परिसरातील वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्यासह शेतकऱ्यांनी विटा येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. खंडित वीजपुरवठ्यामुळे पिके वाळून गेली आहेत. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत न केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्री. मोहिते यांनी दिला.

कळंबी येथील तीन विद्युत ट्रान्स्फॉर्मर चोरीला गेले आहेत. त्याचा भार एकाच ट्रान्स्फॉर्मरवर टाकल्याने वीजपुरवठा सुरळीत चालत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून शेतकऱ्यांनी महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. श्री. मोहिते म्हणाले, ‘‘महावितरणने शेती पंपाच्या दिलेल्या बिलात ताळमेळ नाही. याबाबत महावितरणने तातडीने उपाययोजना करावी. राज्यात एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना खानापूर तालुक्यात केवळ विजेअभावी दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येईल.’’

यावेळी संग्राम माने, गणेश सावंत, हणमंत डुबल, विनोद मोहिते, सतीश कदम, शरद मोहिते, हणमंत कदम, कृष्णात मोहिते, सुजित गोसावी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com