
बेळगाव - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा दिवाणी न्यायालयात बायपासवरील स्थगीती उठवावी, असा अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने प्राधिकरणाची मागणी फेटाळली आहे. तसेच याबाबत पुढील सुनावणी २७ जुन होणार आहे.
पोलीस बंदोबस्तात हलगा ते मच्छे बायपासचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलीस आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी बायपासच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळे कामाला पूर्णपणे ब्रेक लागला आहे. तसेच शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बायपासच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. असे दाखविण्याचा प्रयत्न करीत काम पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी प्रत्येक करीत आहे.
प्राधिकरणाने जिल्हा दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी शेतकऱ्यांचे वकील ऍड रविकुमार गोकाककर यांनी दाव्याचा निकाल लागे तो पर्यंत बायपासचे कोणतेही काम हाती घेऊ नये तसेच स्थगीती आदेश असताना देखील पोलीस बंदोबस्तात २६ एप्रिल पासून काम हाती घेण्यात आले तसेच उभ्या पिकात मशीनी घालून मातीचा भराव घालून दगड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण होत असल्याने शिवारातील अडचण दूर करावी, अशी मागणी केली.
त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत बायपासचे कोणतेही काम हाती घेऊन नये, अशी स्पष्ट सूचना केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे प्राधिकरणाची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थगिती उठविण्यासाठी प्राधिकरणाच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी येणाऱ्या काळात बायपासचे काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.