Prithviraj Patil : सांगलीच्या राजकारणात आजचा दिवस खूप दुर्दैवी: पृथ्वीराज पाटील

Sangli News : भाजप, महायुतीचे नेतृत्व मात्र सांगलीच्या एकूण राजकारणाला दुय्यम लेखताना दिसत आहे. वसंतदादा, राजारामबापूंपासून ते दिवंगत पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांच्यासह जयंत पाटील, विश्वजित कदम, अण्णासाहेब डांगे, अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक असे एकाहून एक मंत्री या जिल्ह्याने दिले.
Prithviraj Patil
Prithviraj Patil Sakal
Updated on

सांगली : ‘‘सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. महायुती सरकारने सन २०१४ नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी मंत्री नसल्याने जिल्ह्याच्या विकासात बाधा येता कामा नये. त्यासाठी काँग्रेस सतत आक्रमक भूमिका घेत राहील. भाजपने जिल्ह्यावर कसला सूड उगवलाय, हे समजण्यापलीकडे आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com