कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवले.
या देशात दोन पंतप्रधान होऊ शकत नाही. एकच घटना पाहिजे दुसरी चालणार नाही. किती सरकारे आले गेले. पण 370 हटवण्याची कुणाची हिम्मत नव्हती. पण मोदीसारख्या 56 इंच छाती असणारया पंतप्रधानाने हे कलम 370 हटवलं. आत्ता तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना विचारा तुम्ही 370 का हटवले नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
कोल्हापूर येथे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी ते येथे आले होते. शहा तब्बल दोन तास उशीराने आले पण त्यांच्या आगमनानंतर सभेत मोठा उत्साह आला. त्यांच्या आगमनानंतर नागरिकांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.
पुरामुळे कोल्हापूर, सांगलीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल. यासाठी केंद्रसरकार चट्टाणासारखे तुमच्या मागे उभे असेल. कोल्हापूर, सांगली या शहरांच्या विकासासाठी प्रयत्न करू. कोल्हापुरातील बेरोजगारीचा प्रश्न हटविण्यासाठी येथे आयटी हब उभे करणार आहोत.
- अमित शहा
आघाडी सरकाने यांनी किती निधी दिला आणि युती सरकारच्या काळात केंद्रातून किती निधी आला. याचा हिशोब श्री. शहा यांनी त्याच्या भाषणात मांडला.
कोल्हापुरात काँग्रेसने लावलेला टोल युती सरकारने रद्द केला.
- चंद्रकात पाटील, महसूलमंत्री
श्री. शहा म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे मौनी बाबा आहेत तर एअर स्ट्राईक करून दहशतवादी मारले त्यावर राहुल गांधी टीका करत आहेत.
श्री शहा म्हणाले,
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.