

MLA Vishwajit Kadam
sakal
कडेगाव : ‘‘अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, तरुणांना रोजगार, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, एक ट्रिलियन अर्थव्यवस्था, परकीय गुंतवणूक, स्टार्टअप, नवीन उद्योजकता, मॅग्नेटिक महाराष्ट्र, राज्यात नवीन उद्योग, राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांना मदत आदी प्रश्नांबाबत सरकार कधी जागे होणार,’’ असा प्रश्न उपस्थित करत आमदार विश्वजित कदम यांनी सरकारला धारेवर धरले.