कऱ्हाड :''पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याील सिंचनाने सर्वच प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. फक्त विदर्भ मराठवाड्यातच निधी दिला जात असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र आम्ही सरकार म्हणुन विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला. त्यातुन ही कामे पुर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा मजबुत किल्ला तयार होत असुन अभुतपुर्व जनादेश विधानसभेला आम्हाला मिळेल. त्याचे प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीत पहायला मिळेल'', असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचे सांगुण मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''पाच वर्षात सातारा जिल्ह्याील सिंचनाने सर्वच प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतुन धोम बलकवडीचे काम पुर्ण केले असुन पुनर्वसनाचे कामही केली आहे. वांग, मोरणा, वसना-वंगणा उपसा सिंचन योजना, जीहे कटापुर योजनांना निधी मिळत नव्हता, असे सांगितले जात होते. मात्र आम्ही विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला. त्यातुन ही कामे पुर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा मजबुत किल्ला तयार होत असुन अभुतपुर्व जनादेश विधानसभेला आम्हाला मिळेल. त्याचे प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीत पहायला मिळेल.''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.