"कोरोना' संचारबंदी काळातील उल्लंघनाचे गुन्हे मागे घ्या...या संघटनेची मागणी

police checking.jpg
police checking.jpg

सांगली- "कोरोना' संसर्गाची आपत्ती संपूर्ण जगात प्रथमच होती. या काळात पोलिस प्रशासनाकडून कारवाईच्या ओघात सामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आपत्ती काळाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बादशहा पाथरवट यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पोलिस अधीक्षक यांना याबाबत श्री. पाथरवट यांनी निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे, "कोरोना आपत्तीचा अनुभव जगात कोणालाच नव्हता. संचारबंदी आणि लॉकडाउन काळात सुरवातीला कारवाईच्या ओघात प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आले. लॉकडाउन काळात प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने कौतुकास्पद काम केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेसह सर्वजण अहोरात्र कार्यरत राहिले. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार रोखण्यास यश आले. संचारबंदी किंवा लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी कारवाई केली. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

गरजेच्या वस्तू खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक, शेतीकामासाठी निघालेले मजूर, नोकरदार, भाजीपाला विक्रेते, व्यापारी, दूध विक्रेते, मजूर आदींवर गुन्हे नोंदवण्यात आले. काहींची वाहने जप्त करण्यात आली. 
लॉकडाउन आणि संचारबंदी काळात उल्लंघन झाले असले तरी त्यांचा हेतू उल्लंघन करणे किंवा गुन्हा करणे हा नव्हता. तातडीची गरज आणि अज्ञान यामुळे बरेच गुन्हे घडले आहेत. कोरोना हे जगावरीलच संकट आहे. त्यामुळे अशा संकटकाळात सामान्य माणसाच्या जीवनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. भविष्याचा तसेच आर्थिक परिस्थितीचा विचार करून संचारबंदी उल्लंघन किंवा किरकोळ वादावादीचे गुन्हे मागे घ्यावेत. जप्त वाहने परत द्यावीत अशीही मागणी श्री. पाथरवट यांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com