खरसुंडी : खरसुंडी-बलवडी रस्त्यावरील घाटातील कामास एक वर्षापूर्वी मंजुरी मिळूनही अद्याप काम सुरू करण्यात न आल्यामुळे प्रवासी व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. खरसुंडी तीर्थक्षेत्रास जोडणारा खरसुंडी तामखडी विटा हा मार्ग अत्यंत जवळचा व सोयीचा मार्ग आहे. या मार्गातून आटपाडी ही जाता येते. या मार्गातून बरीच गावे जोडली जात असल्याने वाहतूक ही मोठ्या प्रमाणात आहे.
गेली बरीच वर्षे या मार्गाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. खरसुंडी ते तामखडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागली आहे. परिणामी खड्डे चुकवताना आपघाती ही घडत आहे. त्याच बरोबर या मार्गावरील बलवडी घाटातील रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती करण्याच्या कामास गत वर्षी मंजुरी बांधकाम विभागाने दिलेली आहे. मात्र हे काम अद्याप सुरू झालेले नाही.
बलवडी घाटातील कामास मंजुरी देण्यात आली आहे असे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. कोरोनामुळे एक वर्ष तसेच गेले. आता नवीन वर्षात हे काम सुरू होणार की नाही या प्रतीक्षेत भाविक नागरिक व या मार्गावरील प्रवासी आहेत. घाटात धोकादायक वळण व अति उतार असल्यामुळे वाहनधारक जीव मुठीत धरून वाहन चालवीत असतात. या घाटात आत्तापर्यंत पाच ते सात लोकांना जीव गमवावा लागला आहे. तरी रस्त्याचे व घाटाचे काम लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.