
सांगली, ता. 2 ः विश्रामबाग येथील मीरा कॉलनीतील अर्धवट अवस्थेत असणाऱ्या गटारीचे काम आजपासून तातडीने सुरू करण्यात आले. गटार नाल्यापर्यंत नेल्याने त्यातील सांडपाण्याचा निचरा झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
या भागात वीस लाख खर्च करून गटार बांधण्यात आली. गटारीतून पाणी सोडले. मात्र त्याला जायला पुढे मार्गच नसल्याने पाणी तुंबून पुन्हा परिसरातील नागरीकांच्या घरांत शिरत आहे. त्यावर प्रकार टाकणारे वृत्त "सकाळ' मध्ये आज प्रसिद्ध झाले. नागरीकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हा परिसर मुलभूत सुविधांसाठी नागरींकांना झगडावे लागत होते. त्यात सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्थाही या भाग नव्हता. काही दिवसांपूर्वी वीस लाख रूपये खर्च करून याभागात गटार करण्यात आली. ती अर्धवट अवस्थेत होती. त्यातील सांडपाण्याचा निचराही होत नव्हता.
त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी यांनी तातडीने दखल घेतली. संबंधित ठेकेदारास काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. जेसीबीच्या माध्यमातून सांडपाणी जाण्यासाठी मार्ग काढण्यात आला. त्यामुळे तुंबलेल्या गटारी मोकळ्या झाल्या आहेत. तातडीने मागणी पुर्ण केल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण
गटारीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. ही गटार पुढे नाल्याला जोडण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल. गटारीत पाणी तूंबणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- विनायक सिंहासने, नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.