येरळा नदी कोरडी; निंबळक, मोराळे बंधारेही पडले कोरडे : शेतकरी हवालदिल

Yerla River dry; Nimbalak, Morale dams also dried up: Farmers worried
Yerla River dry; Nimbalak, Morale dams also dried up: Farmers worried

बोरंगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्‍यातून पूर्व भागातून वाहणारी व शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या येरळा पात्र व बंधारे एक महिन्यापासून कोरडे पडले आहेत. परिणामी नदीकाठावरील सुमारे चारशे हेक्‍टर क्षेत्रावरील पिके वाळून जात आहे. आरफळ, ताकारी योजनेचे पाणी नदी पात्रात सोडावे, अशी मागणी नदीकाठावरील शेतकरी करत आहेत. 


येरळा नदीकाठावरील वाझर, आंधळी, निंबळक, मोराळे, राजापूर, बोरगाव, तुरची या गावांतील द्राक्ष बाग, ऊस भाजीपाला आदी पिके पाण्यावाचून वाळून जाण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्त करत आहेत. मागील वर्षी अनंत अडचणीला सामना करणारे शेतकरी आता नदीत पाणीच नसल्याच्या संकटाने हवालदिल झाले आहेत.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मागील 7 ते 8 दिवसांपासून या भागात सूर्य आगच ओकतोय. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. तापमाण सुद्धा दररोज वाढतच आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोतही झपाट्याने खालावत चालले आहेत. 


शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात नदीत जॅकवेल खोदली आहेत. दोन कि. मी. पर्यंत पाईपलाईन पाणी पोहोचले आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या बागांची खरड छाटणीला लवकरच सुरवात होणार आहे. खोडवा ऊस पीक, सुरुच्या ऊस लागणी मोठ्या प्रमाणात या भागात झाल्या आहेत.

या पिकांना पाणी न मिळाल्यास पिके वाळून जातील. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा संभव आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ताकारी, आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीपात्रात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची होत आहे. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com