इटकरे - तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील तरुण अभियंता हर्षल अशोक पाटील (वय-३९) यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन जीवन संपविले केली. याबाबत सचिन पाटील यांनी कुरळप पोलिस ठाण्यात माहिती दिली..हर्षल यांच्या आत्महत्त्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांनी घेतलेल्या शासकीय कामांची बिले न मिळाल्याच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्त्या केली असावी अशी चर्चा परिसरात आहे. जल जीवन योजनेतील दीड कोटी रुपयांची बिले थकल्याने उदयोन्मुख अभियंत्याने आत्महत्या केल्याचा आरोप कंत्राटदार संघटनेने केला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील यांनी २२ जुलैला सायंकाळी सहा ते २३ जुलै दुपारी दोनच्या दरम्यान तांदूळवाडी येथील मानसिंग पाटील व युवराज पाटील यांच्या शेतबांधावर असलेल्या लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. याचे कारण समजले नाही. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील करीत आहेत..हर्षल यांना आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. अभियंता असलेल्या हर्षल यांनी आजवर पाणी पुरवठा योजना, जल शुद्धीकरण टाकी अशा स्वरूपाची शासकीय तसेच खासगी कामे सुरू आहेत.त्यांच्या आत्महत्त्येनंतर समाजमाध्यमांवर शासकीय कामांची बिले न मिळाल्यामुळेच त्यांनी आत्महत्त्या केल्याचे संदेश आहेत. त्यांना तब्बल दीड कोटी रुपयांची बिले मिळाली नसल्याची तक्रार ठेकेदार संघटनेने केली आहे. नेहमी हसत खेळत स्वभाव असल्यामुळे हर्षल आत्महत्या करेल असे कधीच कुणाला वाटले नाही..जलजीवन मिशन योजनांचे देयके न मिळाल्याने उदयोन्मुख कंत्राटदार हर्षल पाटील यांने दुर्दैवाने शेतात गळफास घेऊन जीवन संपविले असा आरोप ठेकेदार संघटनेचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, महासचिव सुनील नागराळे यांनी केला आहे. ते म्हणाले, शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनाने हर घर जल ही योजना सुरू केली..ही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता, छोटे कंत्राटदार यांनी घेतली. ही कामे पूर्णत्वास आहेत. मात्र या कामांचे देयके देण्यासाठी शासनाकडे जवळपास १ वर्षांपासून निधीच उपलब्ध नाही. केंद्र हा निधी देऊ शकत नाही असे दिसते. याचा परिणाम म्हणून ठेकेदार आर्थिक खाईत लोटले. त्यात कंत्राटदार हर्षल पाटील बळी गेले.त्याचे शासनाकडे जवळपास १.४० कोटींचे देयके प्रलंबित आहेत. कामे करण्यासाठी त्याने ६५ लाखांचे कर्ज घेतले आहे. अनेक दिवसांपासून तो त्यांच्या मित्रांना मी आत्महत्या करतो, हे शासन पैसे देत नाही. लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत. वडिलांना काय सांगू नका असे बोलत असे, असा आरोप श्री. भोसले यांनी केला आहे..त्यांच्या परीवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत व त्याचे प्रलंबित देयके देऊन सदर त्यांच्या नावे असलेले कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करावे. शासनाने कंत्राटदार यांची सर्व विभागाकडील देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी अन्यथा कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील व आपले कुटुंब नाहक आर्थिक अडचणीत येतील..याची शासनास फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले , महासचिव सुनील नागराळे व सर्व पदाधिकारी यांनी शासनास दिला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.