
11th Class Admission
Sakal
पिंपरी : दहावीचा निकाल लागून दोन महिने उलटले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत एकूण ६५ टक्के प्रवेश झाले असून, शहरातील हजारो जागा रिक्त असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तत्काळ बंद करून पारंपरिक पद्धतीने प्रवेश द्यावेत, अशी मागणी पालक व कनिष्ठ महाविद्यालय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.