पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर; परप्रांतीय कामगार येताहेत परत 

पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यवसाय पूर्वपदावर; परप्रांतीय कामगार येताहेत परत 

पिंपरी : कोरोनामुळे निघून गेलेले काही परप्रांतीय बांधकाम कामगार हळूहळू परतू लागले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. मात्र, अद्याप कामगारांच्या गरजेच्या मानाने त्यांची संख्या खूप कमी असल्याने आगामी काळात घरांच्या किमती वाढण्याची दाट शक्‍यता असल्याने घरे घेण्याची हीच चांगली संधी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रातील अनेक कामगार त्यांच्या मूळ जिल्ह्यांमध्ये अथवा राज्यांमध्ये परत गेले. लॉकडाउननंतर उद्योग, व्यवसायाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, कुशल कामगारांची संख्या कमी आहे. त्यामुळे हा प्रवास अडखळत सुरू आहे. गेल्या काही दिवसात परप्रांतीय कामगार परतू लागले आहेत. त्यामुळे तीन-चार दिवसांपासून काही बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांच्या कामाने काहीसा वेग धरला आहे. बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे यांनी सांगितले, "माझ्याकडे 15 हजार कामगारांची नोंद आहे. केंद्र सरकारच्या अटल आहार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना केंद्र सरकारने नेमलेल्या ठेकेदारामार्फत कामगारांच्या त्यांना साइटवर जेवण दिले जाते. चार दिवसांपर्यंत रोज सात हजार जणांना जेवण दिले जात होते. त्यामध्ये तीन हजारांनी वाढ झाली आहे. या क्षेत्रात 80 टक्के परप्रांतीय कामगार आहेत. निघून गेलेल्या कामगारांपैकी दहा टक्के कामगार परत आले आहेत. मोशी, चिखली या परिसरातील काही बांधकामे सुरु झाली आहेत.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रकल्पांची स्थिती 

काही बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्याकडील कामगारांच्या रोज जेवणाची व्यवस्था केली होती. तरीही अनेक कामगार त्यांच्या गावी निघून गेले. त्यामुळे बांधकाम प्रकल्प पूर्ण वेळेत पूर्ण होणे अवघड आहे. दुसरीकडे कच्चा माल, लेबर चार्जेस वाढले आहेत. परिणामी दोन वर्षात पूर्ण होऊ शकणार प्रकल्प पूर्ण होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. परिणामी प्रति चौरस फुटाच्या दरात 200 ते 300 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यामुळे ज्यांना घर घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हीच चांगली संधी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कामगारांच्या कमतरतेवर उपाय 

इमारतीचा स्लॅब टाकण्यासाठी सामान्यपणे 50 कामगारांची गरज असते. मात्र, सध्या कामगारांच्या कमतरतेमुळे हेच काम अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने केले जात आहे. कॉंक्रिट मिक्‍सिंग करणाऱ्या यंत्राचा ऑपरेटर, रिमोट ऑपरेटर आणि दोन मिस्त्री अशा चौघांद्वारे अनेक मजली इमारतींच्या स्लॅबचे काम करण्यात येत आहे. 

आमच्याकडे 1200 ते 1300 कामगार होते. मात्र, सध्या केवळ 400 कामगार आहेत. उर्वरित कामगार गावी निघून गेले. शहरात आमचे दहा प्रकल्प सुरू आहेत. मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी यंत्रसामग्रीचा अधिकाधिक वापर करीत प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे बांधकाम खर्चात वाढेल. त्यामुळे जे उशिरा घर घेतील त्यांना प्रतिचौरस फूट 200 ते 300 रुपये जास्त मोजावे लागू शकतात. परिणामी घर घेण्याची सध्याचा काळ उत्तम आहे. 

- वसंत काटे, बांधकाम व्यावसायिक, पिंपळे सौदागर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com